आज आपलं एक समाज म्हणून, एक देश म्हणून भरकटत जाणं पाहता संपूर्ण गांधीजींपर्यंत पोहोचणं तातडीचं बनलं आहे.
एका रात्री सगळ्या आत्म्यांसोबत एक नवीनच म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये येतो. सगळे या म्हाताऱ्याला विचारतात, ‘तुझं कोणी नातेवाईक इथे आहे का?’ तर म्हातारा म्हणतो, ‘होय आणि नाही पण’. सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये कोणाला तरी शोधत फिरत राहतो. परत कोणीतरी म्हाताऱ्याला विचारतो, ‘तुम्ही कोणाला शोधत आहात?’ तर म्हातारा म्हणतो, ‘अशा लोकांना जे माझा खून करू शकतील.’ .......